माझ्या अंतर्बाह्यात
सामावलीस तू.
दूरवर पसरलेल्या मार्गात माझ्या
उभी होतीस तू.
अन् मी पुढेच जात राहिलो,
गुंग होऊन माझ्या विचारांत.
जीवनही गुरफटून गेले
त्या अनुत्तरित प्रश्नांत.
तुला भेटण्यास
दोन शब्द बोलण्यास
वेळच कुठे होता? आता...
आता तर पर्जन्यधारांसमवेत
बरसतेस तू.
आणि शेवटी वेळ
असताना मजपाशी
घाईत आहेस तू.
काय सांगू, काय सांगू आपण...
अजाणताच म्हणतो -
आहे बेमौसम हे शहर.
पुन्हा कधीतरी भेटूया...
अलविदा - ए - गुलमोहर.!
गुरुवार, २३ एप्रिल, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा