गुरुवार, २३ एप्रिल, २००९

गुलमोहर.!

माझ्या अंतर्बाह्यात
सामावलीस तू.
दूरवर पसरलेल्या मार्गात माझ्या
उभी होतीस तू.
अन् मी पुढेच जात राहिलो,
गुंग होऊन माझ्या विचारांत.
जीवनही गुरफटून गेले
त्या अनुत्तरित प्रश्नांत.
तुला भेटण्यास
दोन शब्द बोलण्यास
वेळच कुठे होता? आता...
आता तर पर्जन्यधारांसमवेत
बरसतेस तू.
आणि शेवटी वेळ
असताना मजपाशी
घाईत आहेस तू.
काय सांगू, काय सांगू आपण...
अजाणताच म्हणतो -
आहे बेमौसम हे शहर.
पुन्हा कधीतरी भेटूया...
अलविदा - ए - गुलमोहर.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...