मंगळवार, ८ मार्च, २०११

अर्थसंकल्प...

अर्थसंकल्प हा सारा
कसा घ्यावा विचारात?
गरिबांनी हो आणावे
कसे सुख संसारात?

महागली वीज बाई
झाले महागडे अन्न.
अर्धपोटी राहुनिया
कसे जगावे प्रसन्न?

दरवाढ औषधाची,
झाला विमाही महाग.
सांगा रित्या या हातांनी
कशी विझवावी आग?

गेल्या सा-या सवलती
लाचखोरांच्या घशात.
जनसामान्यांचे हित
आता साधावे कशात?

असो कोणताही पक्ष
असो कोणताही नेता.
कामाआधी विचारती
चहा पाणी किती देता?

डोळे उघड रे जरा
मतदारा, बळीराजा.
नाही कोणीही कोणाचा
तूच वाली आता तुझा.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...