अर्थसंकल्प हा सारा
कसा घ्यावा विचारात?
गरिबांनी हो आणावे
कसे सुख संसारात?
महागली वीज बाई
झाले महागडे अन्न.
अर्धपोटी राहुनिया
कसे जगावे प्रसन्न?
दरवाढ औषधाची,
झाला विमाही महाग.
सांगा रित्या या हातांनी
कशी विझवावी आग?
गेल्या सा-या सवलती
लाचखोरांच्या घशात.
जनसामान्यांचे हित
आता साधावे कशात?
असो कोणताही पक्ष
असो कोणताही नेता.
कामाआधी विचारती
चहा पाणी किती देता?
डोळे उघड रे जरा
मतदारा, बळीराजा.
नाही कोणीही कोणाचा
तूच वाली आता तुझा.
मंगळवार, ८ मार्च, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
1 टिप्पणी:
kya baat hai... arthvishayak kavita prathamach wachali.. surekh...
टिप्पणी पोस्ट करा