मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

माणुस...

माणुस...

माणुस मरता मारुन जातो
मागे काही उरत नाही.
अन् तरीही आठवणींची
गर्दी काही सरत नाही.

जन्म जातो देण्या-घेण्यात
विषय वासनेची ओझी नेण्यात.
किती घेतले, किती दिले हे
काही केल्या स्मरत नाही.

नाती, गोती तुटतात सगळी,
स्वप्ने कितीएक राहती अधुरी.
ही स्वप्नांची भग्न मंदिरे
मिटल्या डोळ्यांतही विरत नाही.

ही साद असे शेवटची माझी,
नको मनात ठेऊ राग काही.
ओठांवरील वेदना दडपली
पण नयनी अश्रू ठरत नाही.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...